Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणास रानकवी म्हणुन ओळखले जाते?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFउत्तर - ना. धो. महानोर यांना रानकवी म्हणुन ओळखले जाते.
नामदेव धोंडो महानोर हे एक मराठी कवी आणि गीतकार होते. विशेषतः त्यांच्या निसर्गकवितांसाठी ते प्रसिद्ध आहेत. महानोर हे रानकवी म्हणून देखील ओळखले जातात. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली अनेक गाणी गाजली. एक होता विदुषक, जैत रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा सारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. रानातल्या कविता (१९६७) हा महानोरांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी ही त्यांची कादंबरी १९७२ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गपसप (१९७२) आणि गावातल्या गोष्टी (१९८१) हे लोककथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी लोकगीतांचे एक संकलनही (पळसखेडची गाणी, १९८२) प्रसिद्ध केले आहे. नामदेव धोंडो महानोर यांना २००० या साली पानझड या साहित्यकृती साठी मराठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.
Additional Informationविष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव कुसुमाग्रज हे आहे. नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. १९७४ मध्ये विष्णु वामन शिरवाडकर यांना नटसम्राटसाठी मराठीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच १९८७ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
प्रकाश यशवंत आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय आहेत. हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली. आंबेडकरी चळवळ संपली आहे, धेरी नगरी चौपट राजा, महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री वारकरी आणि वारकरीच, कॅन इट बी स्टॉप्ड! ही त्यांची काही पुस्तके आहेत.
Last updated on Jun 25, 2025
->Bombay HC Clerk Rejection List 2025 has been released for 10,218 candidates who haven't filled the application fees.
-> Bombay High Court Clerk 2025 Eligibility List was out now for the screening test.
-> Bombay High Court Clerk 2025 Notification has been released.
-> A total number of 129 vacancies have been released. Candidates can apply from 22nd January to 5th February 2025.
-> The High Court reserves the right to adopt an appropriate method/methods for the shortlisting of the candidates at any stage of recruitment process.
-> The candidates can check out the Bombay High Court Clerk Cut-Off from here.